उस्मानाबाद :- सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत समाधान योजना अर्थात प्रशासन जनतेच्या दारी हा उपक्रम भूम तालुक्यातील ईट महसूल मंडळात राबविला जाणार असून रविवार, दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन करण्यात येणार आहे.
ईट (ता. भूम ) येथील पाथरुड रोडवर असणाऱ्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार राहुल मोटे, पंचायत समिती सभापती आण्णासाहेब भोगील, जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना थेट लाभ मिळावा, प्रशासनाविषयी असणारी नकारात्मक मानसिकता नाहिशी होऊन सकारात्मक दृष्टीकोनातून नागरिकांची कामे व्हावीत हा या समाधान योजना उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत विविध विभागांचे अधिकारी एकाच छत्राखाली येऊन त्या-त्या विभागांच्या योजनांचा लाभ ईट महसूल मंडळातील गावांतील नागरिकांना देणार आहेत. ईट महसूल ईट, डोकेवाडी, नागेवाडी, पांढरेवाडी, झेंडेवाडी, पखरुड, ज्योतीबाचीवाडी, घुलेवाडी, गिरलवाड, जांब, मात्रोवाडी, ईराचीवाडी, निपाणी, आंद्रुड, लांजेश्वर, गिरवली, सोन्नेवाडी, अंजनसोडा, घाटनांदूर, चांदवड या गावातील नागरिक याचा लाभ घेऊ शकणार आहेत. या महसूल मंडळातील सर्व नागरिकांनी या समाधान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, भूमचे उपविभागीय अधिकारी एस. बी. महिंद्रकर आणि भूमच्या तहसीलदार अहिल्या गाठाळ यांनी केले आहे.
या उपक्रमात तहसील कार्यालयाशी संबंधित जात, नॅन क्रिमीलेअर, रहिवासी, उत्पन्न आदी प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, सातबारावर वारस नोंद करणे, अज्ञान पालनकर्ता नोंद कमी करणे, निवडणूक ओळखपत्र वाटप, महसूल विषयक इतर सर्व कामे, विशेष साहाय्य योजना अर्ज स्वीकृती, प्रलंबित फेरफार नोंदीवर कार्यवाही, आम आदमी विमा योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज, पारधी समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. याशिवाय, पंचायत समितीशी निगडीत इंदिरा आवास योजना, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र व ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रमाणपत्रे देणे, महाराष्ट्र गार्मीण रोजगार हमी योजनेंतर्गत घेतलेल्या विहिरींची नोंद घेणे, रमाई योजनेंतर्गंत लाभार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप केले जाणार आहे. तसेच शिक्षण विभागाशी संबंधित अपंग समावेशित शिक्षण योजनेसाठी लाभार्थी यादी ठरविणे, अपंग विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती देणे, अस्वच्छ व्यवसायात असणाऱ्या कामगारांच्या मुलांचे शिष्यवृत्ती प्रस्ताव पडताळणी करुन दाखल करुन घेणे, मॅट्रीकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेतील अऍनलाइन भरलेल्या फॅर्मच्या प्रती स्वीकारणे, कृषी कार्यालयामार्फत लाभार्थ्यांना रेनगन व खते वाटप, टिबक सिंचन प्रस्ताव स्वीकारणे व लाभार्थी निवडणे, शेतकरी जनता अपघात विमा योजना, माती नमुने तपासणी, पशु संवर्धन विभागामार्फत पशुवैद्यकीय दवाखान्यात पशु आरोग्य तपासणी व लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने नेत्रतपासणी, कुपोषित मुलांची आरोग्य तपासणी, महिलांची हिमोग्लोबीन तपासणी, किशोरवयीन मुलींची रक्त व हिमोग्लोबीन तपासणी आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत. वीजमंडळाच्या वतीने शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी, वीजबिलाची दुरुस्ती, घरगुती नवीन वीज जोडणी देण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बस सवलत पाससे वितरण केले जाणार आहे. पोलीस दलाच्या वतीने गाव तंटामुक्त करण्यासाठीची कार्यवाही, प्रतिबंधात्मक प्रकरणे (चॅप्टर केसेस)आपापसात प्रकरणे निकाली काढणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. याशिवाय याठिकाणी आधार कार्ड नोंदणी कार्यक्रमही घेण्यात येणार आहे.
या विभागांशिवाय वन, सहकार, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व विभाग यात सहभागी होणार आहेत.
ईट (ता. भूम ) येथील पाथरुड रोडवर असणाऱ्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार राहुल मोटे, पंचायत समिती सभापती आण्णासाहेब भोगील, जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
शासनाच्या विविध योजनांचा नागरिकांना थेट लाभ मिळावा, प्रशासनाविषयी असणारी नकारात्मक मानसिकता नाहिशी होऊन सकारात्मक दृष्टीकोनातून नागरिकांची कामे व्हावीत हा या समाधान योजना उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत विविध विभागांचे अधिकारी एकाच छत्राखाली येऊन त्या-त्या विभागांच्या योजनांचा लाभ ईट महसूल मंडळातील गावांतील नागरिकांना देणार आहेत. ईट महसूल ईट, डोकेवाडी, नागेवाडी, पांढरेवाडी, झेंडेवाडी, पखरुड, ज्योतीबाचीवाडी, घुलेवाडी, गिरलवाड, जांब, मात्रोवाडी, ईराचीवाडी, निपाणी, आंद्रुड, लांजेश्वर, गिरवली, सोन्नेवाडी, अंजनसोडा, घाटनांदूर, चांदवड या गावातील नागरिक याचा लाभ घेऊ शकणार आहेत. या महसूल मंडळातील सर्व नागरिकांनी या समाधान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, भूमचे उपविभागीय अधिकारी एस. बी. महिंद्रकर आणि भूमच्या तहसीलदार अहिल्या गाठाळ यांनी केले आहे.
या उपक्रमात तहसील कार्यालयाशी संबंधित जात, नॅन क्रिमीलेअर, रहिवासी, उत्पन्न आदी प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, सातबारावर वारस नोंद करणे, अज्ञान पालनकर्ता नोंद कमी करणे, निवडणूक ओळखपत्र वाटप, महसूल विषयक इतर सर्व कामे, विशेष साहाय्य योजना अर्ज स्वीकृती, प्रलंबित फेरफार नोंदीवर कार्यवाही, आम आदमी विमा योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज, पारधी समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. याशिवाय, पंचायत समितीशी निगडीत इंदिरा आवास योजना, दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र व ग्रामपंचायत स्तरावरील विविध प्रमाणपत्रे देणे, महाराष्ट्र गार्मीण रोजगार हमी योजनेंतर्गत घेतलेल्या विहिरींची नोंद घेणे, रमाई योजनेंतर्गंत लाभार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप केले जाणार आहे. तसेच शिक्षण विभागाशी संबंधित अपंग समावेशित शिक्षण योजनेसाठी लाभार्थी यादी ठरविणे, अपंग विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती देणे, अस्वच्छ व्यवसायात असणाऱ्या कामगारांच्या मुलांचे शिष्यवृत्ती प्रस्ताव पडताळणी करुन दाखल करुन घेणे, मॅट्रीकपूर्व अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेतील अऍनलाइन भरलेल्या फॅर्मच्या प्रती स्वीकारणे, कृषी कार्यालयामार्फत लाभार्थ्यांना रेनगन व खते वाटप, टिबक सिंचन प्रस्ताव स्वीकारणे व लाभार्थी निवडणे, शेतकरी जनता अपघात विमा योजना, माती नमुने तपासणी, पशु संवर्धन विभागामार्फत पशुवैद्यकीय दवाखान्यात पशु आरोग्य तपासणी व लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या वतीने नेत्रतपासणी, कुपोषित मुलांची आरोग्य तपासणी, महिलांची हिमोग्लोबीन तपासणी, किशोरवयीन मुलींची रक्त व हिमोग्लोबीन तपासणी आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत. वीजमंडळाच्या वतीने शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी, वीजबिलाची दुरुस्ती, घरगुती नवीन वीज जोडणी देण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बस सवलत पाससे वितरण केले जाणार आहे. पोलीस दलाच्या वतीने गाव तंटामुक्त करण्यासाठीची कार्यवाही, प्रतिबंधात्मक प्रकरणे (चॅप्टर केसेस)आपापसात प्रकरणे निकाली काढणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. याशिवाय याठिकाणी आधार कार्ड नोंदणी कार्यक्रमही घेण्यात येणार आहे.
या विभागांशिवाय वन, सहकार, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व विभाग यात सहभागी होणार आहेत.