उस्मानाबाद :- कृषि विभागामार्फत हवामान आधारित पथदर्शक पिक विमा योजना जिल्ह्यात रब्बी ज्वारी व हरभरा या पिकासाठी लागू करण्यात आली आहे. सन 2013-14 मध्ये रब्बी ज्वारी, हरभरा पिकासाठी विमा प्रस्ताव बँकेत भरण्याची अंतीम तारीख 15 ऑक्टोबर,2013 अशी असून जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
या योजनेतून अवेळी पाऊस, तापमान (कमी/ जास्त) व आर्द्रता या घटकापासून समाविष्ट पिकांना होणाऱ्या नुकसानीसाठी 25 हजारापर्यंत संरक्षण मिळणार आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्ता म्हणून भरावयाची रक्क्म रब्बी व ज्वारी व हरभरा या पिकासाठी 500 रुपये प्रति हेक्टरी बँकेत भरुन पीक संरक्षित करावे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी किंवा सबंधित उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
या योजनेतून अवेळी पाऊस, तापमान (कमी/ जास्त) व आर्द्रता या घटकापासून समाविष्ट पिकांना होणाऱ्या नुकसानीसाठी 25 हजारापर्यंत संरक्षण मिळणार आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्ता म्हणून भरावयाची रक्क्म रब्बी व ज्वारी व हरभरा या पिकासाठी 500 रुपये प्रति हेक्टरी बँकेत भरुन पीक संरक्षित करावे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी किंवा सबंधित उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.