व्यासपीठावर तुळजापूर पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्हाण, राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघाचे जिल्हाध्यक्ष लखन चव्हाण, नाईकनगराचे सरपंच योगेश राठोड, गणेश नगरचे सरपंच विनायक पवार, रामदास चव्हाण, भनुराम राठोड, गोरबंजारा महापरिवर्तन संघटनेचे अध्यक्ष पिन्टु राठोड, आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना क्षिरसागर यानी सांगितले की,बंजारा समाज मागसलेला असून याबाबत रेणके अयोग्याकडे वेळोवेळी मागण्या केलेल्या असून आपण गेल्या 9 वर्षापासून पुरोगामी क्रांती महासंघ, दलित महासंघ व दलित चळवळीच्या माध्यमातून काम करत आहे
बंजारा समाजाच्या जिल्हास्तरीय मेळाव्यामध्ये ऊसतोड कामगार व गवंडी कामगारांना 50 वर्षानंतर पेन्शन मिळावे , वसंतराव नाईक यांचे स्मारक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात व्हावे, महाराष्ट्रातील तांडे, नगराची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी, तांडा सुधार योजनेची रक्कम वाढवून द्यावी, घरकुल योजना यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. .
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश चव्हाण, भास्कर चव्हाण, प्रेमदास राठोड व सेवालाल मित्रमंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले यावेळी तालुक्यातील बंजारा समाजाचे अनेक कार्यकर्ते नागरिक कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रासताविक जेतालाल राठोड तर आभार शंकर चव्हाण यांनी केले.