उस्मानाबाद :- सामाजिक वनीकरण विभागामार्फत शेतीच्या बांधावर वृक्ष लागवडीचा शुभारंभ पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते मौजे खानापूर येथील शेतकरी सोपान भूजंग गरड यांच्या शेती बांधावर बांबूचे रोप लावून करण्यात आला.
यावेळी उपस्थित लाभार्थी सोबत मंत्री महोदयांनी संवाद साधून मोठ्या प्रमाणात बांबूच्या रोपांची लागवड करावी, असे आवाहन केले. यावेळी माजी आ. ओमराजे निंबाळकर, नगराध्यक्ष श्री. मकरंद राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी श्री. राधाकृष्ण गमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, विभागीय वन अधिकारी श्री. राजेश्वर सातेलीकर, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण श्री. ए. व्ही. बेडके, वनक्षेत्रपाल अशोक घुले, जिल्हाप्रमुख श्री. कैलास पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, वन कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.