विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारताच्या सामाजिक व राजकीय जीवनावर आपल्या विचारांचा व कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटविला असे चिंतक व समाजसुधारक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गणना केली जाते.

14 एप्रिल 1891 रोजी वडील रामजी व माता भिमाबाई यांच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने तेजस्वी किरण जन्माला आला. त्या तेजस्वी किरणाची आजच्या जगाला महासुर्य म्हणून ओळख आहे. असं म्हणतात, ना कोणत्याही यशस्वी माणसाच्या मागे कोणाचातरी हात असतोच हो तसंच होतं हेही बाबासाहेबांना त्यांच्या आईचं प्रेम मिळालं नाही कारण आता त्या लवकरच बुद्ध वासी झाल्या होत्या. बाबासाहेबांना खरी साथ दिली ती त्यांच्या वडिलांची घरची परिस्थिती हलाखीची होती तरी त्यांच्या वडिलांनी बाल भीमावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून कायम  त्याच्यावर लक्ष ठेवायचे त्यांनाही पुस्तक वाचनाची आवड असल्याकारणाने घरात पुस्तकांचा संग्रह होता. म्हणून बाबासाहेबांच्या जीवनात वाचनाची आवड निर्माण झाली आणि ही वाचनाची कला आज जगात एक नवीन ओळख निर्माण करून गेली आहे.

प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षण हे पूर्ण करून 1900 साली सातारा हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी आली या शाळेत प्रवेश घेऊन त्यांना खूप आनंद झाला पण तेथील वातावरण पाहून त्यांनी ते हायस्कूल सोडून मुंबईतील एल्फिन्स्टन या हायस्कूलला प्रवेश घेतला.

त्यानंतर बाबासाहेबांचे लग्न झालं व रमाई बाबासाहेबांच्या पत्नी झाल्या. रमाईच्या रुपांन बाबासाहेबांना एक आधार आणि एक पाठबळ मिळालं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथील कॉलेजमध्ये शिकून 1912 मध्ये बीए ची परीक्षा दिली जानेवारी  1913 मध्ये बीए परीक्षेत उत्तीर्ण झाले. गुरुवर्य केळुस्कर आणि दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्नांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून डॉ. आंबेडकरांना रुपये 25 दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. मुंबई विद्यापीठाची बीए पदवी संपादन करणारे व अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवला होता.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, जोपासलेली बुद्धिमत्ता पाहून 1913 साली परदेशात अभ्यासाला जाण्यासाठी बाबासाहेबांची निवड करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांनी विद्याभ्यासासाठी प्रमुख विषय हा अर्थशास्त्र व इतर विषय म्हणून समाजशास्त्र इतिहास राज्यशास्त्र मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञान विषय निवडले.

बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठात 1950 आली "ऍडमिशन अँड फायनान्स ऑफिस इंडिया कंपनी"हा प्रबंध सादर केला या प्रबंधाच्या आधारावर बाबासाहेबांनी एम ए ही पदवी मिळवली. 1916 साली बाबासाहेब लंडनला आले अर्थशास्त्रात पदवीसाठी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये मास्टर ऑफ सायन्स साठी आणि डॉक्टर सायन्स साठी प्रवेश घेतला. कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर व्हावे अशी महत्त्वाकांक्षा बाळगत त्यांनी ग्रेज इन येथे प्रवेशासाठी अर्ज केला. परंतु शिष्यवृत्ती काल मर्यादा संपल्याने ते मायदेशी परतले.बडोदा संस्थांमध्ये 151 रुपयाची  नोकरी केली . मुंबई येथे सिडनहॅम कॉलेजमध्ये "राजकीय अर्थशास्त्र" शिकवण्यासाठी जाऊ लागले. पुन्हा लंडनला जाण्याची तयारी केली प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन लंडनला गेले."लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स"या संस्थेत मास्टर ऑफ सायन्स साठी प्रवेश मिळवला. तसेच ग्रीन संस्थेत नाव दाखल करुन बॅरिस्टर चा अभ्यास केला वर्षभरात त्यांनी शोध प्रबंध तयार केला. हा प्रबंध स्वीकारून 20 जून 1922 रोजी विद्यापीठाने मास्टर ऑफ सायन्सची पदवी प्रदान केली. 28 जून 1922 रोजी "बॅरिस्टर ऍट लॉ" ही पदवी बहाल केली त्यानंतर पुढे लंडन विद्यापीठाकडून "डॉक्टर ऑफ सायन्स" ची पदवी बहाल करण्यात आली.

अस्पृश्य समाजासाठी स्वतः काहीतरी करावे असे त्यांना मनापासून वाटे त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचे चैतन्य निर्माण होई. व ते पुढे पाऊल टाकत गेले पहिली सुरुवात म्हणजे त्यांनी 1920 साली सुरू केलेले पाक्षिक पत्र "मूकनायक" होय. हे वृत्तपत्र सुरु करतेवेळी शाहूमहाराजांनी 2000  रुपये आर्थिक मदत दिली होती.1926 साली  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. 1927 च्या सुरुवातीस बाबासाहेबांनी अस्पर्श विरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. बाबासाहेबांनी प न्याय मिळवून देण्यासाठी व हक्क मिळवून देण्यासाठी महाड येथे पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला.बाबासाहेबांनी महाड येथे कुलाबा परिषद भरवली अध्यक्ष स्वतः बाबासाहेब होते. या परिषदेत मांडलेले  ठराव पास झाले.20 मार्च 1927 रोजी परिषदेतील मोर्चा चवदार तळ्या कडे वळवला बाबासाहेब सर्वप्रथम तळ्यातील पाणी प्यायले असा हा चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रह नेते म्हणून शोभत ही होते. पाण्याचा घोट घेऊन त्यांनी इतरांना पाणी पिण्याची मोकळीक दिली पुढे त्यांची प्रगती होत गेली पाच वर्ष झगडत राहिल्याने नाशिकचा "काळाराम मंदिरात"अस्पृश्यांना प्रवेश मिळाला याच काळात "बहिष्कृत भारत" नावाचे नियतकालिक सुरू केले. अस्पृश्यांना न्याय मिळवून देण्याचे खूप मोठे कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या काळात केले.

शेती व्यवसाय संबंधी बाबासाहेबांनी समाजव्यवस्थेची जोडला होता ग्रामीण भागातील मातीवर आधारित समाज व्यवस्थेचे कारण त्यांनी ग्रामीण आर्थिक व्यवस्थेत शोधले होते. पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे.शेतकऱ्यांना शाश्‍वत पाणी मिळणे गरजेचे आहे पाण्याशिवाय उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर उंचावण्यास शक्य नाही हे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते.शेतीला शाश्‍वत पाणी पुरवठा होण्यासाठी नदीच्या पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजेत देशात घडणार्‍या दुष्काळ हे मानवनिर्मित आहेत. दुष्काळ हटवायचा असेल तर दुष्काळात पाण्याचे नियोजन करावे.जिरायती बागायती शेती करण्याचे प्रयत्न वाढवावेत शेती व शेतमजूर समृद्ध झाला तर हा देश समृद्ध होईल असा मूलभूत विचार त्यांनी मांडला. पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली ही योजना "दामोदर खोरे परियोजना" म्हणून ओळखली जाते.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा पहिला संप घडवून आणला हा संप इ.स. 1928 ते 1934 या कालावधीत रायगड जिल्ह्यातील चरी या गावात झाला. चिपळूण येथील जिल्हा शेतकरी परिषदेत कोकणातील खोती दारी विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले जमिनीच्या समस्येवर शोधनिबंध एका प्रसिद्ध मासिकात प्रकाशित केला शेतकऱ्यांसाठी त्यांनी "पिक विमा ही योजना"सुचवली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर केवळ जातिव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते

. असेही नव्हे त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते शिक्षण ,अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती, अर्थकारण, राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्यांकडेही अवधान होते.

बाबासाहेबांनी भारतातील सर्व समाजाचा आणि सर्वप्रथम देशाचाच विचार केला एकीकडे ते जसे 1932 मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांना स्पर्शाचा न्याय्य हक्कांसाठी लढतात तसेच दुसरीकडे भारतातील सर्व स्त्रियांच्या उन्नतीसाठी विशेषतः हिंदू समाजातील स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा संपत्तीतील हक्क ,घटस्फोट इत्यादी बाबतीत स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिंदू कोड बिल संसदेत मांडतात आणि ते नामंजूर झाले म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा ही देतात. तर स्त्रीयांना अधिकार मिळत नाही यामुळे बाबासाहेबांनी मंत्री पदाचा त्याग केला .डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे पकके समर्थक होते. त्यांच्यावर तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणुकीचा व महात्मा फुले यांच्या कार्याचा प्रभाव होता.बाबासाहेबांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याच्या आद्य पुरस्कर्ते होत. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रीत करणे आवश्यक असल्याचे त्यांचे आग्रही भूमिका होती. ते स्त्रीशिक्षण शिक्षणाचे पुरस्कर्ते होते औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली त्यात मुलींनाही प्रवेश मिळवून दिला.

स्वतंत्र भारतातील लोकशाहीविषयी चिंतन करतांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, "जोपर्यंत इंग्रज सरकार होते' तोपर्यंत आपल्या देशातील चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपण त्यांच्यावरच टाकत होतो पण आपण आता स्वतंत्र झाल्यामुळे चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी आपलीच राहणार आहे त्यामुळे आपल्या आता अधिक जबाबदारीने वागावे लागणार आहे . यासाठी आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढले पाहिजे. मी हिंदू ,मी मुसलमान, मी ख्रिश्चन मी इसाई मी जैन मी बुद्ध यांना दुय्यमत्व ठेवून मी प्रथम भारतीय व अंतिमतः ही भारतीयच आहे असे आपण मानले पाहिजे. डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचा शब्दाशब्दात राष्ट्रप्रेम वास करीत होता. त्यामुळे केवळ दलितांचे किंवा संविधानाचे निर्माते नसून ते आधुनिक भारताचे एक प्रमुख निर्माता होते.

15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यावर भारतातल्या लोकांची विशिष्ट पद्धतीने राजकारभार करता यावा यासाठी भारताची स्वतंत्र राज्यघटना असणे आवश्यक झाले त्यादृष्टीने भारतीय विद्वानांची एक तज्ञ समिती निर्माण केली त्यामध्ये चे प्रमुख होते त्यांचे कायदामंत्री म्हणून निवड करण्यात आली त्यावेळी राज्यघटना लिहिण्याचे काम हे बाबासाहेबांकडे होते अहोरात्र कष्ट करून आपल्या अंगी असलेली बुद्धी वापर करून राजयघटना लिहून पूर्ण झाली त्यामुळे त्यांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार"  म्हणतात.

" पिकते ते  विकत नाही" असेही आपल्याजवळ असलेल्या माणसाचे गुण आपण समजू शकत नाही जाणू शकत नाही दुसऱ्या माणसाला त्याची पारख होते म्हणून 1952 झाली अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने "डॉक्टर ऑफ लॉ" ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला त्यांनी स्वातंत्र्य समता बंधुता या लोकशाही तत्त्वाचा पुरस्कार करणारे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले भाषणे दिली आणि आपली दीनदलितां बद्दलची भूमिका स्पष्ट केली शिक्षण, समाजकारण ,राजकारण या सर्वांमध्ये त्यांनी आपली स्वतंत्र तर्कशुद्ध विचार मांडून दाखविले.दलित समाजात जागृती निर्माण झाली तेव्हा त्यांना ज्ञानाचे महत्त्व पटले आजही त्यांच्या नावाने कार्यालय ,महाविद्यालय ,विद्यापीठ कार्यरत आहेत.

त्यांचा हिंदू धर्मातील पाखंडी संतांना विरोध होता भारत देशावर त्यांचे उलट प्रेम होते त्यामुळे हिंदू धर्मातून परधर्मात जाण्याचा विचार करताना ही भारतातच उगम पावलेल्या धर्मातच आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली नागपुरात त्यांनी लाखो अनुयायी सोबत 1956 साली बौद्ध धर्माची शिक्षा घेतली. त्याचे सर्व आयुष्य कष्टात गेले जातीने प्रशासनाला लोकांकडून त्यांची हेटाळणी झाली त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी उच्च शिक्षण घेतले व मोठेही झालेले अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागले .पैशाचा अडचणीत मार्ग काढावे लागले.त्यासाठी त्यांनी उन्हातान्हाची पर्वा न करता अतोनात कष्ट केले. त्यामध्ये सहाजिकच त्यांची प्रकृती ढासाळत गेली आणि रक्तदाब, मधुमेहाने शरीर थकले होते.

दलित समाजासाठी अमूल्य कार्य करणारे शिका ,संघटित व्हा, संघर्ष करा असा मूलमंत्र देणारे घटनातज्ञ ,राजनीतीतज्ञ ,अर्थतज्ञ ,मानववंशशास्त्रज्ञ ,समाजशास्त्रज्ञ ,कायदेपंडित ,वकील, इतिहासकार ,लेखक ,शिक्षकतज्ञ ,प्राध्यापक ,धर्मशास्त्रज्ञ, पत्रकार, राष्ट्रवादी, क्रांतिकारक, समाजसुधारक, संपादक, सत्याग्रही ,प्रभावी वक्ता व दूरदृष्टी असलेले विचारवंत आपल्या कर्तृत्वाची स्मृती मागे ठेवून 6 डिसेंबर 1956 रोजी या विश्वाला सोडून गेले मरणोत्तर त्यांना "भारतरत्न" हा किताब बहाल करण्यात आला. अशा या थोर पुरुषाला कोटी कोटी अभिवादन ........
जय हिंद  जय भीम  जय महाराष्ट्र

बालाजी शिवाजी पालमपल्ले 
रा.जळकोट ता.तुळजापूर 
मो.७७६९८३४९८४
ईमेल: balajipalampalle111@gmail.com
 
Top