लोहारा : अशोक दुबे

जे करायचं ते चांगलंच, जे करायचं ते गोरगरीब रुग्णांच्या भल्यासाठीच हा मूलमंत्र गेली २४ वर्ष जपणारे ग्रामीण रुग्णालय सास्तुरचा स्पर्श पँटर्ण आपल्या अनोख्या शिस्तीच्या रुग्णसेवेमुळे लॉक डाऊन काळातही योद्ध्या प्रमाणे कार्य करत आहे.

 कोरोना विषाणूच्या भयंकर महामारीमध्ये मानसिकरीत्या घाबरलेल्या ग्रामीण जनतेला मानसिक आधार देण्याचे काम स्पर्श ग्रामीण रूग्णालया मार्फत केले जात आहे. प्रत्येकाच्या मनात कोरोनाची भीती बसलेली असताना कुशल योद्धा रणांगणात जसा हिमतीने लढतो त्या पद्धतीने कोरोना विषाणू महामारीच्या या लॉकडाऊन काळात काम करून स्पर्श ग्रामीण रुग्णालयाने आपले आरोग्य सेवेतील वेगळेपण जपले आहे. कोरोनाला घाबरण्या पेक्षा शास्त्रीय पद्धतीने स्वतः ची व कुटुंबाची काळजी कशी घ्यावी याचे महत्व गागोगावी जाऊन जनतेचे समुपदेशन करण्याचे काम ग्रामीण रुग्णालय सास्तूर (स्पर्श) चे कर्मचारी करत आहेत. व्यक्तीक व परिसर स्वच्छता, सतत हात धुणे, हात धुण्याच्या योग्य पद्धती, किमान ३० सेकंद हात धुण्याचे  महत्व व त्याबद्दलचे प्रात्यक्षित तसेच मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधल्यानंतर त्याला सतत हात लाऊ नये, सत्तत हात लावल्यास त्याचे होणारे दुष्परिणाम या बद्दल रुग्णालयमार्फत सर्व कर्मचारी गावोगावी जाऊन स्पिकरद्वारे मार्गदर्शन करत आहेत. सकाळीच्या व सायंकाळच्या सत्रात नेटाने हि मोहीम राबविली जात आहे तसेच घरी राहण्याचे महत्व सर्वाना पटऊन दिले जात आहे. 

आज पर्यंत जवळपास ५१ च्या वर गावांमध्ये कोरोना आजाराच्या महामारी मधे घ्यावयाची काळजी या बद्दल स्पर्श ग्रामीण रूग्णालया मार्फत जनजागरण करण्यात येत आहे व बाहेरून आलेल्यांची आरोग्य तपासणी मोबाईल मेडिकल युनिट द्वारे सातत्य पूर्ण केली जात आहे. स्वतंत्र १० खाटांचा विलगीकरण कक्ष कार्यरत असून मुंबई पुणे व इतर परिसरातून आलेल्या रुग्णांसाठी वेगळा कोरोना तपासणी विभाग सुरु करून त्याच्या विविध तपासण्या तसेच संशयित रुग्णांचे स्वँब तपासणीसाठी पाठवण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हि सुविधा २४ तास उपलब्ध आहे. ग्रामीण रुग्णालय स्पर्श सास्तूर मार्फत जवळपास २७ जणांचे स्वँब तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आले व ते सर्व निगेटिव्ह आले आहेत तसेच दररोज कोरोना विषाणू संशयीत बाह्य रुग्ण विभागात आतापर्यंत ३५०० हजारच्या वर रुग्णांची तपासणी केली आहे.

 जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यामधून ग्रामीण रुग्णालय स्पर्श हे माता बालसंगोपन साठी राखून ठेवले आहे. त्यामुळे उमरगा-लोहारा व इतर परिसरातून मोठ्या प्रमाणात गरोदर महिला स्पर्श ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल होत आहेत. बाळंतपणे व गरज असल्यास सिझेरियन शस्त्रक्रियेची सुविधा २४ तास उपलब्ध करण्यात आली आहे. प्रत्येक प्रसूती मातेस रोजच्या आहारा सोबत उत्कृष्ट प्रकारचा सकस आहार दिला जातो व डिस्चार्ज च्या वेळी २० दिवस पुरतील एवढे गुळ शेगदाण्याचे लाडू दिले जातात जेणेकरून त्यांचे हिमोग्लोबिन वाढावे तसेच रुग्णवाहिका सेवा २४ तास उपलब्ध आहे तरी जनतेने घाबरून न जाता सर्व नियमाचे व सूचनांचे काटेकोर पणे पालन करावे असे आवाहन करणात आले.

“स्वतः आर बी जोशी गेल्या २५ दिवसापासून स्पर्श मधेच थांबले असून सकाळी ६ वाजल्या पासून रात्री १२ ते १ वाजेपर्यंत हजर राहून २४ तास दक्ष आरोग्य सेवा कार्यरत ठेवली आहे,  आजपर्यंत स्वतहा माईक द्वारे ३२ गावामध्ये कोरोना विषयी व त्याबद्दल घ्यावयाची काळजी, घरी राहण्याचे महत्व याबद्दल अतिशय कडक भाषेमध्ये ग्रामस्था बरोबर संवाद साधला ज्या ज्या गावातील लोकप्रतिनिधीनि आवाज दिला तेथे जाऊन संपूर्ण आरोग्य तपासणी केल. माता बालसंगोपन साठी स्पर्श राखून ठेवल्यामुळे उमरगा, लोहारा व इतर सर्वांनी बाळंतपण, सिझेरियन किंवा इतर आजार विषयी स्पर्श सास्तूर येथे यावे २४ तास सेवा उपलब्ध असून ज्यांना गरज असेल त्यांनी कॅ।ल करावा त्यांना रुग्णवाहिका आणण्यासाठी व नंतर घरी सोडविण्यासाठी उपलब्ध केली जाईल असे आवाहन श्री रमाकांत जोशी यांनी केले “
 
Top