पांगरी-  गारपीठ,अवकाळी पाऊस व निसर्गाचे बिघडलेले ऋतुचक्र यामुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍याने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (दि.20) सोमवारी पहाटे तिन वाजण्याच्या सुमारास कारी ता.बार्शी येथे घडली.राजेंद्र मचिन्द्र चौधरी (वय 40 रा.कारी) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी शेतकर्‍याचे नांव आहे.
  बालाजी शिवाजी चौधरी वय 30 रा.कारी यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या खबरीत म्हटले आहे की मयत राजेंद्र चौधरी यांनी सोमवारी पहाटे त्यांच्या रहात्या घरी घराच्या वाश्याला स्वत:ला गुंडाळून घेऊन गळफास लावून घेत आत्महत्या केली.
  मयत शेतकरी राजेंद्र चौधरी यांच्यावर राष्ट्रीयकृत बॅंकचे सहा लाखाचे कर्ज असून त्यांना तीन मुली आहेत.चार एकर शेतीतून मिळणार्‍या उत्पन्नातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.मात्र सततची होणारी गारपीठ,अवकाळी पाऊस व निसर्गाचा बिघडलेला समतोल यामुळे त्यांची परिस्थिती विदारक झालेली होती.नुकत्याच कारी परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने त्यांचे शेतातील उभे पीक नेस्तनाबूत केल्यामुळे चौधरी हे शेतकरी निराश झाले होते.पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजू राठोड हे करत आहेत
 
Top