
यावेळी बोलताना माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी म्हणाले की, आज आपल्या देशात, राज्यात भाषावाद, प्रांतवाद, जाती-जातीमध्ये दुषित वातावरण पसरले आहे. त्यांचे दंगलीत रुपांतर होत आहे. एवढेच नाही तर आपल्या देशातील, परदेशातील समाजसुधारक येशूख्रिस्त सॉक्रेटीस, रॉजर बेकन, कोपरनिकस, गॅलिलिओ, संत तुकाराम, इंदिरा गांधी, राजीव गांधी अशा थोर व्यक्तींची माथेफिरुंनी गोळया घालून त्यांची हत्या केली. समाजातील धर्मांध लोकांनी समाजासाठी कार्य करणा-यांना गोळया घालून ठार केले. ते मेले असले तरी त्यांच्या कार्याची भावना, विचार मरु शकत नाहीत. म्हणून माणसाने माणसारखे वागणे गरजेचे आहे, असे मत आलुरे गुरुजी यांनी व्यक्त केले.
यावेळी सामाजिक परिवर्तन संस्थेचे मारुती बनसोडे, हॅली मेडिकल फाऊंडेशनचे डॉ. शशिकांत अहंकारी, कोषाध्यक्ष रामभाऊ सदाफुले, निवृत्त मुख्याध्यापक महादेव नरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी जि.प. सदस्य महादेव आलुरे, जि.प. सदस्य पार्वतीबाई घोडके, तुळजापूर पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, सोसायटीचे माजी चेअरमन रामचंद्र आलुरे, संचालक गोपिनाथ बिच्चे, मुख्याध्यापक हणुमंत घुगे, प्राचार्या डॉ. अनिता मुदकण्णा, दयानंद काळुंके, भैरवनाथ कानडे, सोमनाथ बनसोडे, बसवराज नरे, सिकंदर अंगुले, महावीर कंदले, राम हराळे, सुभाष मोकाशे, नवनाथ ढोबळे, माजी सरपंच प्रबोध कांबळे यांच्यासह शिक्षक, प्राध्यापक, विदयार्थी व नागरीक उपस्थित होते. डॉ. दाभोळकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ अणदूरमधील व्यापा-यांनी बाजारपेठ बंद ठेवली होती. जवाहर विदयालयात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम सुरु असताना डॉ. दाभोळकर यांच्या हत्येची वार्ता सि.ना. आलुरे गुरुजी यांना कळाली. त्यानंतर शोक मिरवणूक व शोकसभेचे आयोजन करण्यात आले.